६१ वेळा रक्तदान आणि गरजूंना मदतीचा हात - डॉ. सुहास दुर्गादासराव पाठक आज या व्यासपीठावर उभे राहून मला मनापासून अभिमान वाटतो, कारण माझ्या आयुष्यातील सामाजिक जबाबदारीची ही भावना मी केवळ शब्दांत नाही तर कृतीतून जपली आहे. आतापर्यंत ६१ वेळा रक्तदान करण्याचे भाग्य मला लाभले, ही गोष्ट मी माझ्या कर्तव्याचा एक छोटासा भाग मानतो. रक्तदान हे कोणाच्यातरी जीवनासाठी आशेचा किरण ठरू शकते, आणि ही जाणीव मला नेहमी प्रेरणा देत आली आहे. एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणेच नव्हे, तर मानवतेचे मूल्यही प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे, हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. रक्तदानासोबतच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काहीतरी करण्याची ओढ मला कायम आहे . त्यामुळेच अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये मी शक्य तितक्या देणग्या देत आलो आहे . या देणग्या केवळ आर्थिक नसून त्यामध्ये वेळ, आपुलकी आणि आधार यांचाही समावेश आहे. गरजूंना मदतीचा हात देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान मला अपार ऊर्जा देते आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून देते. माझा ठाम विश्वास आहे की, आपण प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार समाज...
“To empower student journalists through experiential learning, ethical awareness, and a passion for truth, fostering a dynamic journalistic culture within the university.”